23.1 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

spot_img
spot_img

बौध्द विहाराचे बांधकाम पर्यावरणाचा विनाश टाळून करावे —भंते उपाली

बौध्द विहाराचे बांधकाम पर्यावरणाचा विनाश टाळून करावे —भंते उपाली

 

अन्यथा अनुसूचित जाती जमाती अत्याचार निवारण कायदा चा वापर करावा

 

परळी प्रतिनिधी —-परळी पासून जवळच असलेल्या कन्हेरवाडी गांवात बौद्ध विहाराचे बांधकामाला अकोला येथील भंते उपाली यांनी भेट दिली असता बौद्ध विहाराचे बांधकाम पर्यावरणाचा समतोल राखुन करावा बांधकाम करताना पर्यावरणाचे संरक्षण करून आणि खौनखनिज समतोल राखुन नदीच्या वाळुचा वापर करून बांधकाम करावे आणि मानवनिर्मित वाळू (इको सेड ) वापर टाळावा अन्यथा कंत्राटदार वर अनुसूचित जाती जमाती अत्याचार निवारण कायदा 1989 चा वापर करावा असे आवाहन येथील तमाम बौद्ध बांधवांला केले आहे

 

दरम्यान सरकार च्या विविध योजना मधून अनेक गांवात बौद्ध विहाराचे बांधकाम चालू असून पण हे बांधकाम पर्यावरणाचा ऱ्हास करून मानव निर्मित वाळुचा सर्रास वापर होत आहे त्यामुळे नदीच्या वाळुचा उपयोग कमी करून हाजारो टन इको सेड चा वापर करून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार कंत्राटदार करत आहेत शिवाय 53 ग्रेडचे सिंमेट चा वापर न करता 33,43 ग्रेड सिंमेट चा वापर करत आहेत आणि 24 एम एम स्टील ऐवजी 10 एम एम स्टील वापरत असलेल्या मुळे या बौध्द विहाराच्या बांधकामाला तडे जातात असे अनेक ठिकाणी उदयास आली म्हणून शक्यतो कंत्राटदाराने पर्यावरणाचा समतोल राखुन नदीच्या वाळुचा उपयोग करून बांधकाम करावे असे प्रतिपादन अकोला येथील भंते उपाली यांनी केले आहे अन्यथा कंत्राटदारारा येथील युवकांनी अनुसूचित जाती जमाती कायदा 1989 नुसार धडा शिकविण्यासाठी पुढे यावे असे आवाहन केले आहे

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या