24.1 C
New York
Sunday, June 22, 2025

Buy now

spot_img
spot_img

गेवराई पंचायत समितीसमोरील उपोषणाचा तिसरा दिवस – बाळू तोडेकर यांची प्रकृती ढासळली

गेवराई, महाराष्ट्र आरंभ (शुभम घोडके) : गेल्या तीन दिवसांपासून आमरण उपोषणास बसलेल्या उपोषणकर्त्याची तब्येत ढासळली असून, पंचायत समितीच्या प्रशासनाने सदरील उपोषणाकडे दूर्लक्ष केल्याचा आरोप सर्व पक्षीय नेत्यांनी केला आहे. दरम्यान, बुधवार ता. 11 रोजी सकाळी अकरा वाजता उपोषणास बसलेल्या बाळू तोडेकर यांची प्रकृती ढासाळली आहे. त्यामुळे, पंचायत समिती परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. जिल्हा परिषदेचे माजी सभापती युद्धाजीत पंडित, युवा नेते यशराज पंडित यांनी पंचायत समिती कार्यालयाकडे धाव घेऊन, बीडीओ श्रीमती कांबळे यांच्याशी चर्चा केली. माणूस मेल्यावर कारवाई करणार का ? असा संतप्त सवाल युद्धाजीत पंडित यांनी श्रीमती कांबळे यांना विचारला. या चर्चेत भाग घेऊ पाहणार्‍या भ्रष्ट इंजिनिअर श्रीमतीसासवडे यांना चांगलेच झापले. महिला आहात म्हणून तुमचा आदर करतो. शांत बसा, माणूस तीन दिवस झाले उपोषण करतोय आणि तुम्ही ढुंकून ही पाहत नाहीत. प्रशासनाची ही मुजोरी खपवून घेणार नाही. तुम्ही केलेल्या भ्रष्टाचारची जंत्री जनतेला ही माहित आहे. अशी तंबीच युद्धाजीत पंडित यांनी यावेळी बोलताना दिली. त्यानंतर, भ्रष्ट शाखा अभियंता म्हणून ओळख निर्माण झालेल्या सासवडे मॅडम यांनी पंचायत समितीत कार्यालयातून पळ काढल्याची चर्चा आहे. इंजिनिअर म्हणून, श्रीमती सासवडे यांची कारकिर्द प्रचंड वादग्रस्त आहे. मात्र, त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. या संदर्भात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दरम्यान, उपोषण कर्ते बाळू तोडेकर दि.9 मे रोजी सकाळी अकरा वाजता उपोषणास बसले आहेत. तिसर्‍या दिवशी त्यांची प्रकृती चिंताजनक झाली असून त्यांनी, उपचार घेण्यास नकार दिल्याने, तणाव वाढला. ते बेशुद्ध अवस्थेत पंचायत समिती कार्यालयासमोर पडून आहेत. गेवराई उपजिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी श्री. सानप यांनी त्यांची रक्त चाचणी केली. त्यांची शुगर लेव्हल व्यवस्थित आहे. मात्र, त्यांना उपचाराची गरज असल्याचे डॉक्टर कादरी यांनी सांगितले. मंगळवार ता. 10 रोजी गेवराई चे पाटील बाळराजे पवार यांनी रात्री उशिरा उपोषण कर्ते बाळू तोडेकर यांची विचारपूस करून, बीडीओ श्रीमती कांबळे यांच्याशी चर्चा केली होती. सर्व पक्षीय नेत्यांनी तोडेकर यांच्या उपोषण स्थळी भेटी दिल्या आहेत. गेंड्याची कातडी धारण करून, मुग गिळून गप्प बसलेल्या प्रशासना विषयी प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या