पाडळी गावातून असंख्य युवक जयदत्त अण्णांच्या साथीला
बीड दि.26(प्रतिनिधी)ः- बदलत्या राजकीय समीकरणात बीड मतदारसंघातील अनेक कार्यकर्ते आणि तरुणांची फळी आजही माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या बरोबरच राहून गावच्या विकासाच्या प्रवाहात सामील झालेली दिसते, शनिवारी पाडळी गावातील असंख्य तरुण जयदत्त अण्णांच्या साथीला आले आहेत.
गावचा विकासाचा दृष्टिकोन लक्षात घेऊन सध्याच्या परिस्थितीत सक्षम नेतृत्व म्हणून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे शिरूर (कासार) तालुक्यातील पाडळी येथील तरुणांनी दाखवून दिले. सभापती उषाताई विजय सरवदे, पाडळी येथील प्रकाश इंगळे, बाळू कंठाळे, सचिन इंगळे, गोकुळ इंगळे, भाऊसाहेब इंगळे, विनोद कंठाळे, बंडू कंठाळे, देविदास पाखरे, हनुमान हांगे, सोनू मिसाळ, सचिन कंठाळे, बाबू सानप, नारायण इंगळे, अण्णासाहेब राऊत, निसार पठाण, निखिल माने, प्रशांत सानप, संजय इंगळे, मयूर कंठाळे, भाऊसाहेब दराडे, ज्ञानोबा इंगळे, संतोष इंगळे, सुदाम इंगळे, महेश इंगळे, ऋषी राऊत यांच्यासह कार्यकर्ते माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या साथीला आले आहेत.